वेंगुर्ले येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले | दाजी नाईक : शासन आपल्या दारी अभियानात वेंगुर्ले तालुक्यात दिलेल्या उदिष्ठापेक्षा जास्त काम झाल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लाभार्थी यांचे कौतुक आहे. दरम्यान लोककल्याण हे ध्येय उराशी बाळगून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ देता यावा या उद्देशाने आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी” अभियान शासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचा सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केले.वेंगुर्ले तहसिल कार्यालय व वेंगुर्ले पंचायत समितीच्या एकाित्मक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी अहील्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पानवेकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
व्यासपिठावर वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी, नायब तहसिलदार संदिप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन भोई, वेंगुर्ले न. प. मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पशुधन विकास अधिकारी विदयानंद देसाई, एकाित्मक बालविकास अधिकारी श्रीमती सामंत, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितिन मांजरेकर आदी उपस्थित होते.वेंगुर्लेचे तहसीलदार ओमकार ओतारी आपले प्रास्ताविक सादर करताना म्हणाले की, शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यासाठी विविध विभागातील १० हजार लाभार्थ्यांचे उदिष्ठ देण्यात आले होते. मात्र वेंगुर्ले तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी उत्कृष्ठ काम केल्याने अभियान कालावधीत एकूण १२२६६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ६५११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित ५७५५ लाभार्थी प्रस्तावित आहेत.
तर शासन आपल्या दारी हि योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु केली. शासन कोणाचेही असो. शासकीय योजना या चांगल्या असतात. मात्र त्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी कशी करतात त्यावर त्या योजनांची फलनिष्पत्ती अवलंबून असते. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत वेंगुर्ले तालुक्यात चांगले काम झाले, यापुढेहि येथील प्रशासनाने कार्यतत्पर रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, व शिवसेना तालुका प्रमुख नितिन मांजरेकर यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी मोहन भोई, एकाित्मक बाल विकास प्रकल्प अधिकारी सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी माझी कन्या भाग्यलक्ष्मी, महात्मा गांधी सिंचन विहीर योजना, गुरांसाठी गोठा बांधणे वगैरे विविध योजनांमधील लाभार्थ्यांना मान्यवरांचे असते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता नवार यांनी तर आभार नायब तहसिलदार संदिप पानमंद यानी मानले. या कार्यक्रमास अपेक्षेपेक्षाहि जास्त लाभार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.