खेड(प्रतिनिधी) शनिवारी दुपारपासून तालुक्यात धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाली. रविवारीही सकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यात आटलेल्या जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे येथील पंचायत समितीकडून ३ खासगी
टँकरने होणारा पाणीपुरवठा रविवारपासून बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील ३२ गावे ५२ वाड्यांना एक शासकीय व ३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान शमवण्यात आली.असून सद्यस्थितीत मॉन्सून च्या जल धारांनी पाणी टंचाई आटोक्यात आली आहे
पावसाने उघडीप घेतल्यानंतर ग्रामस्थांची मागणी
आल्यास शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात १० मार्चपासून पोसरे बुद्रुक सडेवाडी येथे पाण्याचा पहिला टैंकर धावला. त्यानंतर एकामागोमाग
एक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
एकीकडे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढत असताना प्रशासनाकडे अवघा एकच शासकीय टँकर
उपलब्ध होता. यामुळे तहानलेल्या गाव-वाड्यांना टँकरची बऱ्याच वेळा प्रतीक्षाच करावी लागली होती.
पाणीटंचाईने कहर केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ३ खासगी टँकर उपलब्ध केले. मात्र, तरीदेखील अपुऱ्या टँकरअभावी तहानलेल्या गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची
दमछाकच झाली होती.
शेतातून जाणारे रस्ते बंद झाल्याने चार दिवसापूर्वीच तुळशी, चिरणी, खोपी, कुळवंडी, नांदिवली, अस्तान,
कोंडिवली, निळीक, सवणस आदी गावांचा पाणीपुरवठा थांबला होता. धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे आटलेले जलस्त्रोत उपलब्ध झाल्याने ३२ गावे
५३ वाड्यांना खासगी टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. १० मार्चपासून २४ जूनपयर्यंत
शासकीय टँकरच्या १७९ व खासगी टँकरच्या १५१ अशा एकदिवसाआड ३३० फेऱ्या टंचाईग्रस्त गाव-
वाड्यांमध्ये धावल्या.