पाणी वाचविणे हे पाणी निर्माण करण्यासारखेच : जलप्रेमी गिरीधर परांजपे

 

सावंतवाडीत तालुका पत्रकार संघातर्फे जलसंवर्धन जनजागृतीचा उपक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी : पृथ्वी हे अनमोल रत्न आहे. त्याची जपणूक करा, पृथ्वीचे मूळ स्त्रोत पाणी आहे. पाण्याला कोणताही पर्याय नाही ते तयार करू शकत नाही. पाणी वाचविणे म्हणजेच पाणी निर्माण करण्यासारखे आहे. त्यामुळे ते देशहिताचं कार्य आहे, असं प्रतिपादन निवृत प्राचार्य तथा जलप्रेमी गिरीधर परांजपे यांनी सावंतवाडी येथील ‘जलसंवर्धन’ सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी केलं. निवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धन तथा पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश देण्यासाठी जलसंवर्धन सप्ताहाचे आयोजन सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, वनविभाग सावंतवाडी आणि राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना जीवसृष्टीचे असस्तित्व पाण्यातून आहे.निसर्गाशिवाय पाणी तयार होत नाही. बेसुमार पाणी उपसल्याने जमिनीची जल पातळी कमी होत आहे. त्यासाठी पाण्याची बचत करण, संवर्धन करणं आणि पाण्याच प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे असं मार्गदर्शन केल.
तर पाणी म्हणजे जीवन आहे. परिणामकारक घटकामुळे जलचक्र विस्कळीत झाले आहे. निसर्गसाठी पाणी महत्त्वाचे आहे. त्याच संवर्धन करा असा संदेश सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी दिला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, पाण्याचा तुटवडा आम्ही पाहतो अनुभवतो. त्यामुळे हा उपक्रम काळाची गरज बनला आहे असे उद्गार काढले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत म्हणाले, पाणी अनमोल असून पाण्याचे महत्त्व यापूर्वीच्या पिढ्यांनाही जाणले आहे. भूगर्भातील पाणी साठा कमी होत आहे. सर्वांच्या जीवनाच्या निगडित असलेल्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घ्या अन् जल संवर्धन करा. त्यासाठी विविध उपक्रम हाती घ्या असं आवाहन त्यांनी केलं. तर गाळ काढण्यासाठी मोती तलाव आटव्यानंतर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच उदाहरण देत पुनर्वजांच्या दुरदृष्टीचे दाखले देत पाण्याची बचत कशी करता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असं मत व्यक्त केले. यानंतर शाळेच्या परिसरात ५’×३’×२’ मापाचा चर खणून पावसाळ्यात पाणी मुरवण्यासाठीच्या पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आरपीडी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, शिवप्रसाद देसाई, वनपाल प्रमोद राणे, दत्ता पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गांवकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस, मोहन जाधव, नरेंद्र देशपांडे, हर्षवर्धन धारणकर, अनंत जाधव, शुभम धुरी, अनुजा कुडतरकर,भुवन नाईक, नितेश देसाई, आरपीडीचे पर्यवेक्षक पी.एम. सावंत, शिक्षक दशरथ शृंगारे, सौ. तोंडवळकर, विद्यार्थी उपस्थित होते.