मळगाव हायस्कूल येथे शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रमाचे आयोजन
सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माजगांवचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. त्याचे जमिनीशी असणारे नाते आई व मुलासारखे असते. मेहेनात करुन तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळें शेतकरी जगाचा खरा पोशिंदा आहे. पण या शेतीपासून युवा वर्ग दूर जात आहे. या युवा वर्गाला शेतीकडे आकृष्ट करण्यासाठी माजगाव सहयोग मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमातून युवक शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं. असा उपक्रम राज्यभर राबविण्याची खरी गरज असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगाव तर्फे मळगाव हायस्कूल येथे आयोजित केलेल्या शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होतें. या उपक्रमाचे उद्घाटन तेली यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज लखमराजे भोसले हे होते. यावेळी व्यासपीठावर पंचम खेमराज महाविद्ालयाचे प्राचार्य डी एल भारमल, माजगाव सहयोग मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, मळगाव ऐक्यवर्धक संस्थेचे संचालक रामचन्द्र केळुस्कर,सहा, गटविकास अधिकारी चव्हाण, मळगाव सरपंच सौ. स्नेहल जामदार, माजगाव सरपंच डॉ. सौ. अर्चना सावंत, माजी जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गजानन नाटेकर, आबा केसरकर, नंदू गावडे, भोसले पॉलिटेक्निक फार्मसी चे प्राचार्य जगताप, मळगाव उपसरपंच पेडणेकर, कळसुलकर माजी विद्या्र्थि संघाचे गोठोस्कर, तळवडे हायस्कूल मुख्याध्यापक देसाई, मंडळाचे पदाधिकारी टोपले, अण्णा देसाई, प्रा. गोवेकर, आदी उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना युवराज भोसले म्हणाले, शेती पिकासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. शेतकऱ्यांनी नव्या तंत्राचा अवलंब केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील पर्यटन बहरत आहे. त्यामुळें शेतीच्या जोडीने दुसरा शेती पूरक व्यवसाय केल्यास निश्चितच आर्थिक क्रांती घडेल. यासाठी आतापासूनच युवकांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. अशा उपक्रमातून युवकांचे शेतीशी असणारे नाते अधिक घट्ट होईल, असे म्हणाले.
यावेळी सहा. गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले, एक दाणा पेरलात तर १००० दाणे मिळतील. शेतकरी स्वतः प्रयोगशील असतो. मात्र युवा वर्ग आज शेतीपासून दूर जात आहे. या वयातच मुलांना शेतीचया महत्वाचे ज्ञान मिळाले पाहिजेत या उपक्रमाच्या निमित्ताने शेतीशी असणारे नाते घट्ट करन्याचा निर्धार करूया, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी जगताप यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष प्रा. गोडकर यांनी विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम आयोजीत केल्याचे सांगितले. सर्वांचे स्वागत मंडळाचे पदाधिकारी बाळू धुरी, नंदिहली, बिर्जे, टोपले, गोवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मांजरेकर यांनी तर आभार नंदीहली यांनी मानले. दरम्यान शिक्षण मंत्री यांनी मंडळाला शुभेच्छा संदेश पाठवला. सध्याच्या विज्ञान व तांत्रिक युगात शालेय व महािद्यालयीन मुले तंत्र ज्ञानाकडे वळत असताना मुलांना शेतीची आवड निर्माण होण्यासाठी मंडळाने आयोजीत केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
या उपक्रमात १५० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांना मंडळातर्फे रेनकोट देण्यात आले. मुलांनी प्रत्यक्ष शेतीकामात सहभाग घेतला युवराज भोसले यांनीही स्वतः ट्रॅक्टर हातात घेतला.