सुषमा अंधारेंकडून संत महंतांचा अपमान ; आळंदीत वारकऱ्यांनी काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा.!

ठाकरे सेनेला मतदान न करण्याची वारकऱ्यांनी घेतली शपथ

पुणे

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे आळंदीत संतप्त वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तर ठाकरे सेनेतून त्यांची हाकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.अंधारे आहेत त्या ठाकरे सेनेला मतदान न करण्याची वारकऱ्यांनी शपथ घेतली आहे.
प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे.आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे ?
” सुषमा अंधारे यांनी पैठणच्या सभेत टीका करताना, ‘रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार.… आरे तुम्ही रेंड्यांना शिकवले रे! पण माणसांना कुठे शिकवले?’ असे वक्तव्य केल्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला.
सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्यामुळं त्यांना माऊली म्हटलं गेलं. परंतु माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर माझ्या आईनं 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं, ती माझ्यासाठी विश्ववंदनीय आहे. असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्याची खिल्ली उडविली होती.

प्रतिकात्मक अंतयात्रा काढली..!
सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. आळंदी येथील वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलेचा हार घालत निषेध केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंच्या प्रतिमेस चपलांचा हार घालत वारकऱ्यांकडून त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यात आलं.
संतांबाबत आधी अभ्यास करा -कीर्तनकार मडके
संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा, असा सल्लाही वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंन दिला आहे, तसेच वारकरी संप्रदाय हा जातपात न मानणारा असून साधुसंतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचं देखील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदायाला छेडण्याचे काम सुषमा अंधारेंनी केले ते त्यांनी करु नये असे आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके यांनी सल्ला दिला.

अंधारे यांचा पक्षाने राजीनामा घ्यावा

वारकरी संप्रदाय हा जातपात मानणारा संप्रदाय नाही. साधुसंतांनी सर्वांना समानतेचा आणि एकतेचा संदेश दिलेला आहे. त्यामुळं सुषमा अंधारेंनी संतांबद्दल बोलताना अभ्यास करून बोलावं, असंही आंदोलक कीर्तनकार महेश मडके म्हणाले. याशिवाय वारकरी संप्रदायाबाबत असे विचार ठेवणाऱ्या सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.