जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनातून मिळालेला उत्साह व चैतन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामात कायम ठेवावे!

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर.

सिंधुनगरी | प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलन हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक जवळचं नातं निर्माण होतं! या निमित्ताने झालेल्या क्रीडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. हा आनंद व उत्साह प्रशासकीय कामकाजात कायम रहावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी केले.कोरोना काळानंतर ब्रेक लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला आठवड्यापूर्वी सुरुवात झाली होती. त्याचा समारोप आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मंगळवारी शरद कृषी भवन येथे संपन्न झाला. जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी यांचे हे स्नेहसंमेलन वैशिष्ट्यपूर्ण व आदर्शवत मानले जाते. या स्नेहसंमेलनाचे व समारोप सोहळ्याचे उद्घाटन जि प चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांचे हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर मुख्य लेखा वित्त अधिकारी वल्लरी गावडे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर समाज कल्याण अधिकारी श्री बेहरे कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण वैभववाडी चे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर वेंगुर्ला गटविकास अधिकारी मोहन भोई मालवणचे सहाय्यक गटविकास अधिकारी शाम सभा या प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्नेहसंमेलन हे प्रत्येकाच्या जीवनात आनंददायी असते. सादरीकरण करताना वेळेचे भान ठेवल्यास आपली कला योग्य पद्धतीने सादर करता येऊ शकते व अशा कलेचा किंवा अशा सादरीकरणाचा आनंद आपल्यासोबत समोरचा ही घेऊ शकतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी केले.
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अथवा क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून टीम वर्क चे बळ मिळते. प्रशासनात काम करत असताना अधिकारी असो अथवा कर्मचारी असो, काम करत असताना अनेकांच्या रोशास सामोरे जावे लागते. क्रीडा स्पर्धा मध्ये जसे टीमवर्क महत्त्वाचे आहे तसेच प्रशासनातील कामकाजातही ती टीम वर्क महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले.
जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात रंगलेल्या अनेक क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण ही या निमित्ताने झाले. आजादी का अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्ये प्रथम क्रमांक दत्तात्रय प्रभूळकर द्वितीय क्रमांक जगदीश राणे तृतीय क्रमांक डॉक्टर कृपा गावडे आणि उज्वला सांगेलकर तर उत्तेजनार्थ अक्षय कारोटे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्नेहसंमेलनातील आयडॉल पुरस्कार तर श्यामसुंदर सावंत यांनी उत्कृष्ट सूत्र निवेदक पुरस्कार पटकावल्याबद्दल त्यांचेही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी कौतुक करत सन्मान केला. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अमित तेंडुलकर यांनी करत जिल्हा परिषदेचे हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरविले!