रत्नागिरी मध्ये महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनीधी | रत्नागिरी : भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आयोजीत टाटा कम्युनिकेशन मुंबई पुरस्कृत तसेच रत्नागिरीतील विविध संघटनाच्या मदतीने रत्नागिरी येथे अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिर दि.१२/०१/२०२३ ते १४/०२/२०२३ पर्यंत आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यशाळेच्या सांगता समारंभात प्रमुख वक्ता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळगावी तील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक अरुण ढंग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संयोजक / आयोजक उत्तम बाळकृष्ण कदम सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप विशद करताना म्हणाले की, ” या शिबिराच्या माध्यमातून उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योग संधी निवड व शोध, उद्योगाशी निगडीत सरकारी व निमसरकारी योजनांची माहिती, बँकेच्या कर्जयोजना, बाजारपेठ सर्वेक्षण आदी बाबीचा अंतर्भाव असल्याचे नमूद केले.”

यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहा. प्रा. अरुण ढंग म्हणाले की, ” उद्योजक हा नावीन्य निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. त्याच्या मनातील नवीन नवीन कल्पना साकार करण्याच्या प्रयत्नात असतो, तो तेवढ्यावर न थांबता पुन्हा पुढे नवीन शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. यावेळी त्यांनी प्रेरणादायी देश-विदेशातील उद्योजकांची ओळख करून दिली.”

अध्यश भाषणात सुनिल देसाई सरांनी केले..त्यांनी EDII चे कामकाज देश व विदेशात कसे चालते याची सविस्तर माहिती व आपल्या आयुष्यातील ३७ वर्षाच्या प्रचंड अनुभवाचे अनेक किस्से व उत्तम कदम संरानी केलेले संघटन कौशल्याचे कौतुक करताना उत्तमोत्तम कामगिरी करणारा उत्तम पाठीशी असेल तर कोकणच काय पुर्ण महाराष्ट्रात उद्योजक बनवु अशी गौरवोउद्गार या प्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रस्ताविक आणि आभार उत्तम कदम यांनी केले. यावेळी आंबेडकर सभागृहाचे व्यवस्थापक श्री. पवार , सौ. निता खामकर व ४१ महिला प्रशिक्षणार्थी उपस्थिती होते.