रत्नागिरी : दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले २५ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे जमा करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी आपले हयात असलेचे व दाखल्यावरती आपला एक फोटो लावून दाखले ग्रामसेवक/ नगरसेवक अथवा बँकेकडुन स्वाक्षरी घेवून सोबत कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे जमा करावी.
जे लाभार्थी दुर्गम भागात राहतात अशा लाभार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. तसेच जे लाभार्थी मयत झालेले आहेत, त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या वारसदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे जमा करावे. जेणेकरुन त्यांचे पुढील अनुदान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३५२- २२२२७१ वर संपर्क करुन आपल्या शंकेचे निराकरण करावे.
हयातीचे दाखले २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत जमा न केल्यास अशा लाभार्थिंचे अनुदान बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले वेळेत सादर न केल्यामुळे आपले अनुदान बंद झाल्यास लाभार्थी स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.