गावखडी/वार्ताहर :गणेश उत्सवानंतर पुण्हा एकदा विजेचा खेळ खंडोबा सुरु झाला असुन त्यामुळें सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे डोर्ले सह अनेक गावांमधे २-२ दिवस विज पुरवठा खंडित राहत असून त्या त्या भागातील लोकांचे विजे अभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर निर्माण झाला आहे यात त्वरीत सुधारणा न झाल्यास विज कार्यालयावर धडक देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे
विज बिलांची वसुली साठि तत्परता दाखवनारे विज वितरण चे अधिकारी विज पुरवठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत असा प्रश्न सर्व सामान्य ग्राहकांना पडला आहे
महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे वारंवार खंडीत होणाऱ्या विजेच्या समत्स्यापासुन जनता पुर्ण हतबल झाली आहे वारंवार खंडीत होणाऱा विज पुरवठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे यामध्यें सुधारणा न झाल्यास महावितरण विरोधात शेवटी नाइलाजास्तव आंदोलनाचा अवलंब करावा लागेल असे शेवटीं संतोष पोकडे यांनी बोलुन दाखवले











