वैभव नाईकांनी समजावे आचऱ्याच्या श्री देव रामेश्वर भूमितून त्यांची पराभवाची जी सुरवात झाली आहे ती आता 2024 ला निलेश राणे आमदार झाल्या शिवाय थांबणार नाही
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी रोखठोक व ठाम विश्वासदर्शकपणे मांडली भूमिका
मालवण | प्रतिनिधी : वैभव नाईक यांनी मागील 9 वर्षात काही न करता जनतेला भूलथापा, खोटी आश्वासनेच दिली. त्यामुळे जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करून वैभव नाईक यांना चपराक दिली आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी समजावे आचऱ्याच्या श्री देव रामेश्वर भूमितून त्यांची पराभवाची जी सुरवात झाली आहे ती आता 2024 ला निलेश राणे आमदार झाल्या शिवाय थांबणार नाही. अशी रोखठोक व ठाम विश्वासदर्शक भूमिका भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी आचरा ग्रामपंचायत भाजप युतीच्या विजयानंतर स्पष्टपणे मांडली आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणूकित केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भावी आमदार निलेश राणे या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने तसेच तालुक्यातील तसेच आचारे गावातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विजय आहे. आम्ही सोबत होतो मात्र हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आहे.
उबाठा गटाचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी आचरा गावात ठाण मांडून होते. मात्र जेरॉन फर्नांडिस व आमचे सर्व सदस्य उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घरोघर प्रचार केला. केंद्र व राज्य शासन यांच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वासामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजना, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चाव्हण यांनी जनतेसाठी करत असलेले विकासकाम सोबत निलेश राणे मतदारसंघात करत असलेले काम, निलेश राणे जास्तीत जास्त निधी कुडाळ मालवण तालुक्यात खेचून आणत आहेत. पालकमंत्री यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठे सहकार्य मिळत आहे. हे सर्व जनतेपर्यत पोहचले. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वाला लाभला लाभला. म्ह्णूनच जे्रॉन फर्नांडिस व सहकारी यांचा मोठा विजय न झाला आहे.
वैभव नाईक यांनी मागील 9 वर्षात काही न करता जनतेला भूलथापा, खोटी आश्वासने दिली. त्यामुळे जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करून वैभव नाईक यांना जनतेने चपराक दिली आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी समजावे आचऱ्याच्या श्री देव रामेश्वर पासून जी सुरवात झाली आहे ती आता 2024 ला निलेश राणे आमदार झाल्या शिवाय थांबणार नाही. अशी रोखठोक भूमिका भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी मांडली आहे.