आता मुइज्जूंच्या डोक्यात पडला प्रकाश, आर्थिक संकटात भारतासमोर हात पसरवला

2023 च्या अखेरीस मालदीने भारताला अंदाजे 400.9 दशलक्ष अमेरिकी डॉलर देणे बाकी आहे Now Muizzoo has adopted a soft stance asking India for help in the economic crisis

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आता भारतासोबत सलोख्याची भूमिका घेतली आहे.

भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि शेजारी देशाने आम्हाला कर्जमुक्ती द्यावी अशी आमची अपेक्षा आहे, असे मुइज्जू यांनी आता म्हटले आहे.

2023 च्या अखेरीस, मालदीवने भारताला अंदाजे 400.9 दशलक्ष अमेरिकी डॉलर देणे बाकी आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यापासून, चीन समर्थक मुइज्जूने भारताबाबत कठोर भूमिका घेतली होती. शपथविधीनंतर काही तासांतच त्यांनी मालदीवमधील भारतीय लष्करी जवानांना 10 मेपर्यंत भारतात परत पाठवण्याची मागणी केली होती.

आता मुइज्जू म्हणतात की भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र राहील. ते म्हणाले की, मालदीवने भारताकडून कर्ज घेतले आहे, जे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. ते पुढे म्हणाले की कर्जाची परतफेड करण्यासाठी ते पर्याय शोधत आहेत आणि भारत सरकारशी सतत चर्चा करत आहेत. भारत या प्रकरणी सहकार्य करेल, अशी आशा मुइज्जू यांनी व्यक्त केली.

मालदीवमध्ये होणाऱ्या संसदेच्या निवडणुकीपूर्वी एप्रिल महिन्यात मुइज्जूने भारताच्या बाजूने आपले मत व्यक्त केले होते. मुइज्जू यांनी डिसेंबर 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचाही संदर्भ दिला. ते म्हणाले की, आमच्या भेटीत मी पंतप्रधान मोदींना असेही सांगितले की, देशात सुरू असलेला कोणताही प्रकल्प थांबवण्याचा माझा हेतू नाही. त्याऐवजी, मी त्यांना बळकट आणि गती देण्याची इच्छा व्यक्त केली. यासोबतच मुइज्जू यांनी दावा केला आहे की, आपण असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही ,ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होईल.