Breaking News : रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट; ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणार वारे, मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी | प्रतिनिधी 

एकीकडे मुंबई सारख्या भागामध्ये धुळीचे वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नासधूस होत असताना कोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट घोषित केला असून त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळ कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

हा यलो अलर्ट १३ ते १५ मे पर्यंत असून या कालावधीत दोन्ही जिल्ह्यातील काही भागांमध्ये तशी ४० ते  ५० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.