विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत माणुसकी जोपासण्याचे काम केलं पाहिजे – डॉ.मिलिंद कुलकर्णी

विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत माणुसकी जोपासण्याचे काम केलं पाहिजे – डॉ.मिलिंद कुलकर्णी

आशिये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कणकवली दि.१५ ऑगस्ट

आशिये गाव निसर्गाच्या सानिध्यात वसला आहे,पाहून मला खूप आनंद झाला आहे.या निसर्गात वाढलेल्या मुलांची जमिनीशी नाळ जोडलेली आहे.शेतकऱ्यांची मुले शैक्षणिक जीवनात यश मिळवतात,त्यामध्ये पालकांनी दिलेले योगदान मोठे असते.विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात चांगली पुस्तके वाचली, ऐकली पाहिजेत.प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत माणुसकी जोपासण्याचे काम केलं पाहिजे,असे प्रतिपादन डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

आशिये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मालवणी कवी विलास खानोलकर,उपसरपंच संदीप जाधव,निवृत्त पोलीस अधिकारी विठोबा गुरव,माजी सरपंच बाळा बाणे,शंकर गुरव,ग्रामपंचायत सदस्य विशाखा गुरव, मानसी बाणे,संजना ठाकूर,अविराज मराठे, सुहास गुरव, दिपाली गुरव,समीर ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोवळकर,दुर्वा जाधव,प्रियंका कोरगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्याध्यापक सावंत मॅडम,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी दहावीत यज्ञेश लाड याने ९८.८० टक्के,हर्ष बाणे ८८.२० टक्के व अन्य १३ आणि बारावी ७ गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण करण्याचा मान सरपंच महेश गुरव यांनी सेवानिवृत्त सैनिक सोनू अस्वेकर यांना दिला.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,सर्वसामान्य लोकांच्या घरी जात डॉक्टरांनी आणि शिक्षकांनी गृह भेट देणं फार महत्वाची आहे.त्यामुळे परिस्थितीची जाणीव येते.मुलांनी आपल्या जीवनात मालवणी भाषेची आत्मीयता बाळगली पाहिजे.माझा देश आहे,देशभक्ती वर बोलताना अभिमान वाटेल असे काम करत राहिले पाहिजे.समाजात माणसांना थाबायला वेळ नाही,जिवंत माणसाची प्रेते सल्यासारखे सर्व जीवन चालले आहे.अस्सल भारतीय म्हणून तुम्ही जगणं वागणं बोलणं सुरु कराल तेव्हाच तो माणूस घडेल. पुस्तक वाचाल तरच चांगले विद्यार्थी घडेल.सामर्थ्य हेच जीवन आहे,हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य आहे.त्यानुसार गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनात बदल आत्मसात करावेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे,आ.नितेश राणे यांच्या सोबत महेश गुरव अनेक वर्षे पडद्यामागून काम करत आहेत.त्यांच्या रुपाने गावाला कर्तुत्वान चांगले नेतृत्व लाभले आहे.सरपंच महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली या गावात विकासकामे होत आहेत.

मालवणी कवी विलास खानोलकर म्हणाले,गावातील विद्यार्थ्यांचा निकाल वाढत आहे,त्याबद्दल कौतुक आहे.विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.तुम्ही बुध्दीने चांगले मार्क्स मिळवले आहेत. अभ्यासाबरोबर शरीर घडविण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी.वाचन ही फार काळाची गरज आहे.जो लेखक आवडेल त्याच्यावर प्रेम करा.

सरपंच महेश गुरव म्हणाले,अमृत महोत्सव दिनानिमित्त प्राणांची आहुती दिली,त्या सर्व भूमिपुत्रांना नमन करतो.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गावच्यावतीने आहे.विद्यार्थांना कौतुकाची थाप मारत त्यांना पुढील काळात यश मिळवण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यानी यशाचे सातत्य राखण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.गुणवंत विद्यार्थी गावासाठी कौतुक आहे.भविष्यातील स्पर्धात्मक यश मिळवण्यासाठी मेहनत करावी, गावाचे नावलौकीक वाढवावे.

या कार्यक्रमात मालवणी कवी विलास खानोलकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मंगेश लाड यांनी तर आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.