रत्नागिरी जिल्ह्याचे महावितरण अपडेट

रत्नागिरी :

20-21-22-23 मे 2025 रोजी झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बाधित आहे. पोल पडणे, वीज यंत्रणेवर झाड पडणे आदी कारणामुळे हा पुरवठा बाधित आहे.

ग्राहकांचा वीज पुरवठा लवकर सुरु करण्याकरता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत, अहोरात्र शिफ्टमध्ये काम करत आहेत. तरी वीज ग्राहकांनी महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

वीज ग्राहक अधिक माहिती करिता व आपल्या तक्रारी नोंदवण्या करिता 1912 , 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

तसेच जिल्ह्यातील बाधित वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने पुढील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(एकूण बाधित / एकूण पूर्ववत)

बाधित उपकेंद्रे – 18/18

बाधित उच्चदाब वाहिन्या – 103/101

पडलेले लघुदाब पोल – 116/57

पडलेले उच्चदाब पोल – 61/22

बाधित रोहित्रे – 5575/5522

प्रभावित गावे – 1153/1142

प्रभावित ग्राहक – 336093/ 331717

महावितरणचे अंदाजित नुकसान – 39 लाख

(नवीन माहिती उपलब्ध होईल तसे या आकडेवारीत बदल अपेक्षित) असे जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) महावितरण यांनी कळवले आहे.