रविवारपासून रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा

 

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेकडून मागील काही महिन्यांपासून रत्नागिरी शहराला एक आड एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता पुरेसा पाऊस पडल्याने शिळ धरणातील पाण्याची पातळी सध्या वाढली आहे. यामुळे उद्यापासून रत्नागिरी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.