सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरामधील तसेच इतरही आजूबाजूच्या गावांमधील लोकहित जपण्यासाठी सामाजिक बांधिलकी संघटना दिवस रात्र राबत असून प्रशासनाने ही या संघटनेच्या माध्यमातून उचलल्या जाणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केली आहे. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये, नैसर्गिक आपत्ती महापुरामध्ये तसेच संकट असलेल्या लोकांसाठी व निराधारांसाठी गेली कित्येक वर्ष निस्वार्थ व प्रामाणिकपणे आपला महत्त्वाचा वेळ देऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सेवाभावी कार्य करत आलेले आहे. शहरातील लोकांसाठी धोकादायक असलेल्या घटकांची माहिती घेऊन प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असतात. शहरांमधील उघडी घटारे, रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे, कोसळायला आलेली घळण, धोकादायक विद्युत पोल व विद्युत वाहिनी, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाड या सर्व घटनांचा क्रम करून हे सर्व विषय एखादी दुर्घटना घडण्याअगोदर प्रशासनाकडे या संस्थेमार्फत मांडले जातात. आणि याच संदर्भातील पंधरा दिवसांपूर्वी जिमखाना ग्राउंड जवळील बेळगाव हायवेवर असलेले मोठे झाड व त्याच्या सुकलेल्या फांद्या रस्त्यावर सतत मोडून पडत असतात याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रसार माध्यमातून याची कल्पना देऊन देखील अद्यापही सदर सुटलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आले नाही.
गुरुवारी सकाळी ११ वाजता सुकलेली मोठी फांदी हवेच्या मधोमध पडली परंतु त्या क्षणाला ये-जा करणार वाहन नसल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. वादळी पावसाचे दिवस असल्याकारणाने प्रशासनाने या सर्व विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन लोकांचे हित जपणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी कळकळीची मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी लोकहितासाठी धडपडणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष द्यावे : रवी जाधव