भात कापणी करताना घ्यावयाची काळजी व प्रक्रिया विषयी यु ट्यूब लाईव्ह (youtube live) द्वारे कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : कोकणामध्ये भात हे मुख्य पारंपरिक पीक आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते . यावर्षी पाऊस उशिरा आल्याने , लागवड हि उशिरा सुरु झाली . त्यामुळे भाताची काढणी देखील उशिरा सुरु आहे. त्याच अनुषंगाने भात कापणी करताना घ्यावयाची काळजी व प्रक्रिया विषयी रिलायन्स फाउंडेशन व कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सदर कार्यक्रम २०-१०-२०२३ youtube live द्वारे घेण्यात आला . सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ” डॉ. विजय दळवी , वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख , कृषी संशोधन केंद्र , शिरगाव ,रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ , दापोली रत्नागिरी अंतर्गत)

उपस्थित होते. सदर कार्यक्रमध्ये भात कापणी करताना घायवयाची काळजी, वैभव विळ्याचा योग्य वापर, साठवणूक करताना घ्यावयाची काळजी इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन डॉ. विजय दळवी सरानी केले. सदर कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले व ऑनलाईन चाट च्या माध्यमातून आपले शंका व प्रश्न विचारले. डॉ. विजय दळवी यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी येथे भात संशोधना संदर्भात माहिती दिली व शेततकऱ्यानी केंद्रात येऊन प्रक्षेत्रास भेट द्यावी असे आव्हाहन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी केले, तांत्रिक मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे श्री मनोज काळे व कार्यक्रमाचे नियोजन कु. प्रणाली गोरे कार्यक्रम सहाय्यक यांनी केले.