पिरावाडी परीसरात अनेकांच्या घरात गेले पाणी
विद्यूत मंडळालाही फटका
आचरा–अर्जुन बापर्डेकर : गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह रौद्र रूप धारण केल्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होवून विद्यूत वाहिन्या तुटून पडण्याबरोबरच पिरावाडी समुद्र किनारया लगतच्या वस्तीत घरात पाणी शिरण्याची घटना घडली. काहीजणांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने इलेक्ट्रानिक उपकरणे,अन्नधान्य, कपडेलत्ते भिजून नुकसान झाले.
आचरा परीसराला गुरुवार सायंकाळ पासून सोसाट्याच्या वारयासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. यात पिरावाडी येथील दिपक साबाजी सारग,यशवंत गुणाजी कावले,गोपीनाथ शकर करजे
सुमन कृष्णा कुबल,विशाखा विठ्ठल खवणेकर,दिपिका दत्ताराम खवणेकर
श्यामसुदर केशव तारी,महेंद्र जोशी आदींच्या घरात पाणी घुसले. याबाबत पिरावाडी ग्रामस्थयावेळी नुकसान ग्रस्ताना नारायण कुबल निवृत्ती जोशी परेश तारी नितेश सारग विवेक कुबल ग्रा.प.स.पूर्वा तारी गोपीनाथ सारंग , करजे
विनोद सारंग धर्माजी सारंग यानी मोलाचे सहकार्या केले. माहिती समजताच आचरा सरपंच जेराँन फर्नाडीस ग्रा.प.स.मुज्जफर मुजावर ,तलाठी संतोष जाधव ,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यानी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामा केला.

चिंदर लब्देवाडी भागातही यश लब्दे,निखिल लब्दे,दिपेश लब्दे,विराज लबृदेआदींच्या अंगणात पाणी आले होते. खाडी किनारपट्टी लगतची भातशेतीही पाण्याखाली गेल्याने नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिरावाडी समुद्र किनारचा संरक्षक बंधारा ठरतोॢय धोकादायक
समुद्र किनारी सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या संरक्षक बंधारयामुळे पिरावाडी परीसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने पाण्याचा निचरा होतनसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे पाणी साचून राहून पाणी वाढत जाऊन ग्रामस्थांच्या घरात पाणी घूसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.यासाठीपुर्वी ज्या ठिकाणाहून पाणी वाहून जात होते. त्याठीकाणी पाणी जाण्यासाठी बंधारयाला पाईप घालून देण्याची मागणी होत आहे.












