बोधगया टेंपल ॲक्ट रद्द करा; बौद्ध गया ताब्यात देण्याची केली मागणी
रत्नागिरी /प्रतिनिधी :बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी (दिनांक ७ जानेवारी २०२५ ) हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनआक्रोश मोर्चा काढला.
बौद्ध भिक्खूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठींबा देत या मोर्चाने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन सादर केले. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मोर्चा माळनाका येथील लोकनेते श्यामराव पेजे यांच्या पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना व न्याय्य मागण्या मांडल्या. या मोर्चात अनंत सावंत, प्रीतम रुके, सुरेश सावंत, एल व्ही पवार, व्ही पवार, संजय आयरे, जयरत्न कदम, सौरभ आयरे, मनोहर मोहिते, गौतम गमरे, उमेश पवार, सिद्धार्थ सावंत, राकेश कांबळे, अमोल जाधव, विकास उर्फ अण्णा जाधव, विलास कांबळे, प्रवीण मोहिते, अशोक कदम, समीर पवार, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, दीक्षा जाधव, धम्मदीप जाधव, बीके कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांच्यासह अनेक जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.












