पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती : राजेश शेळके, प्रसाद रानडे रत्नागिरीचे पदाधिकारी

मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रत्नागिरी जिल्हा निमंत्रक म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेश शामराव शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दापोली येथील पत्रकार प्रसाद यशवंत रानडे यांची समन्वयक म्हणून दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज येथे ही घोषणा केली.

वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी तालुकानिहाय पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांचे पदाधिकारी नियुक्त करावेत असे त्यांना सांगण्यात आले आहे.