एस आर.दळवी फाउंडेशन च्या स्वच्छ्ता मोहिमेला विलवडेतून सुरुवात. फाउंडेशन चा अभिनय उपक्रम

ओटवणे | प्रतिनिधी : स्वच्छ गाव सुंदर गाव हरित गाव हि संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी एस आर फाऊंडेशन ने स्वच्छ्ता मोहिम हाती घेतली आहे आणि या मोहीमेची सुरुवात राजा शिवाजी विद्यालय विलवडे येथे एस, आर. दळवी फाँडेशन चे अध्यक्ष रामचंद्र ऊर्फ आबा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून या मोहिमेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झालेत.यावेळी एस आर फाउंडेशन सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत, तालुकाध्यक्ष गावडे सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत माजी मुख्याध्यापक देसाई सर राजाराम दळवी,मुख्याध्यापक हेवाळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशन च्या माध्यमातून ही स्वच्छता मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार असून त्याचा शुभारंभ आपल्या जन्मभूमी त मायभूमीत व्हावा या उद्देशाने आबा दळवी यांनी आपल्या गावातूनच याची सुरुवात केली.

यावेळी जो मोहिमेचा मुख्य हेतू स्वच्छ गाव सुंदर गाव हा आहे तो स्पष्ट करताना दळवी यांनी मोहिम यशस्वी करण्याचं आवाहन ग्रामस्थांना केले.यावेळी महिला बचत गट, विकास मंडळे अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक,शालेय विद्यार्थी, गावातील शासकीय कर्मचारी यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला गाव स्वच्छ सुंदर करावा. आपला गाव सुंदर झाला तर जिल्हा होईल राज्य होईल आणि आपला देश सुंदर होईल आणि यासाठी सर्वांनी एकत्र येवून आपला गाव स्वच्छतेत आदर्श गाव बनवूया असे आवाहन केले.अनेक मान्यवरांनी हि स्वच्छ गाव सुंदर गाव रोगराई मुक्त गाव, कचरा,प्लास्टिक व्यवस्थापन करून प्लास्टिक मुक्त गाव कसा करता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले.यावेळी चंद्रकांत उर्फ आबा दळवी याने या मोहिमेचा उद्देश उपस्थित ग्रामस्थ मान्यवरांना सांगत प्रत्येक सहभागी वाडीसाठी सहभागाबद्दल पारितोषिक तर स्वच्छ्तेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची भक्षिसे जाहीर केली आहेत.

ग्रामस्थांच्या मदतीसाठी अतिरिक्त टीम चंदगड तालुक्यातुल मागविण्यात आली आहे. तिन दिवशीय या उपक्रमात अनेक हात पुढे सरसावले असून नदी नाले धरण परिसर वाडी यामधील स्वच्छतेमध्ये गुंतले असून विलवडे गाव जिल्ह्यात स्वछतेमध्ये आदर्श मॉडेल बनेल असाच उपक्रम राबवित आहेत. सरपंच प्रकाश दळवी,राजाराम दळवी, सोनू दळवी, मोहन दळवी, परेश धरणे, प्रदीप दळवी, चंद्रकांत दळवी, माजी सरपंच रावजी दळवी, सुरेश सावंत, आपा दळवी, प्रमोद दळवी, कालिदास दळवी, गोपाळ दळवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी,शिल्पा धरणे, हायस्कूल मुख्याध्यापक हेवाळकर सर, ग्रामसेवक मुकुंद परब, आदिंसह असंख्य गशेकडो ग्रामस्थ अभियान उद्देश साध्य करण्यासाठी एकवटले होते. सर्व ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले आहेत.