बांदा | प्रतिनिधी :
बांदा निमजगा, गवळीटेंब व शेटकरवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमी परिसराची साफसफाई केली. ज्येष्ठ ग्रामस्थ हनुमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही वाड्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत स्वच्छता उपक्रम हाती घेतला.
बांदा स्मशानभूमीत झाडीझुडपे वाढली होती. त्यामुळे बांद्यातील तीन वाडीमधील नागरिकांनी साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली. वाढलेली झाडी, शेडची दुरुस्ती, उन्हाळी दिवसांकरिता नवीन दहन जागा व शेडची डागडुजी, रस्ता दुरुस्ती अशी कामे करण्यात आली. तसेच लोकांमध्ये जागृती व्हावी याकरिता तेथेच स्नेहभोजनही करण्यात आले. त्यानंतर वाड्यांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे देखील या तरुणांकडून बुजवण्यात आले.
या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, गोविंद वराडकर, उमेश तोरस्कर, अशोक नाईक, रामा पेडणेकर, अशोक मंजिलकर, संजय नाईक, पप्या वझरकर, रामदास सावंत, विराज देसाई, गुरु कल्याणकर, पंकज देसाई, सिद्धेश केसरकर, महादेव आईर, अभिजीत देसाई, व्यंकटेश ऊरुमकर, मोहन सावंत, सुशांत वराडकर, रवींद्र सावंत, कैलास सावंत, टमा वडार, सुनील धोत्रे, ओंकार सावंत व सतीश शेटकर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बांद्यातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.