रत्नागिरी:
कोकणातील नामांकित असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी संख्येने मोठे असलेले व उत्कृष्ट निकालाची परंपरा जपणारे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात. कला,वाणिज्य, विज्ञान,,एम.सी. व्ही.सी., अशा विविध विभागात तीन हजारहुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
या महाविद्यालयाचे सन.2025-26 सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने रत्नागिरी शहरांमध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये निर्माण झालेले अनेक सामाजिक प्रश्न यांचे मूळ नष्ट व्हावे आणि सामाजिक सलोखा व ऐक्याची भावना वाढीस लागावी, समाजात सकारात्मक बदल घडून यावा या उदात्त हेतूने पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रा कार्यक्रमाला अमली पदार्थ विरोधी जनजागृती, प्रदूषण मुक्ती,निसर्ग संवर्धन,भ्रष्टाचार निर्मूलन,सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, पाणीटंचाई व जलसंवर्धन, राष्ट्रीय सुरक्षा, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण, स्त्री सुरक्षा स्वच्छता पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या सामाजिक विषयावर फलक, घोषवाक्य व संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
या पदयात्रेचे उद्घाटन र. ए.सोसायटीच्या कार्याध्यक्ष मा.श्रीमती शिल्पाताई पटवर्धन व उपकार्याध्यक्ष मा. अँड. विजयराव साखळकर यांनी श्रीफळ वाढवून व हिरवा ध्वज फडकवून शुभारंभ केला. यावेळी संस्थेचे कार्यवाह मा. श्री.सतीशजी शेवडे,सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री.आनंद देसाई, संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रशेखर केळकर, संस्थेच्या आजीव मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा.वैभव कानिटकर,विज्ञान शाखाप्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे, वाणिज्य विभाग प्रमुख सौ.शिल्पा तारगावकर आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, NSS चे विद्यार्थी, NCC कॅडेट्स, सायबर गुन्हे व सुरक्षा यांचे पोलीस दल,रत्नागिरी सोसायटीचे विविध घटक संस्थामधील काही प्रतिनिधिक विद्यार्थी व शिक्षक असे सुमारे तीन हजार जण या भव्य सुवर्ण महोत्सवी जनजागृती पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. या पदयात्रेची लांबच्या लांब रांग पाहून आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून रत्नागिरीकर कौतुक करत होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचा प्रत्यक्ष पदयात्रेबरोबर शेवटपर्यंत सहभाग होता. या पदयात्रेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह स्वयंशिस्त, उत्तम नियोजन दिसून आले होते.
हीं सामाजिक जनजागृती पदयात्रा शुक्रवार दिनांक 23 जानेवारी दु. 3.30 वाजता महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगण येथून सुरू होऊन,– लाला कॉम्प्लेक्स– जेल रोड नाका — माळ नाका –मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा याच मार्गाने, ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयापर्यंत येऊन पदयात्रेचा समारोप झाला.
या सुवर्ण महोत्सवी पदयात्रेचे नियोजन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, व उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी मोठ्या कुशलतेने केले आणि पदयात्रा सफल झाली.
Home महत्वाच्या बातम्या अभ्यंकर कुलकर्णी कानिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक जनजागृती पदयात्रेतून जपली सामाजिक...












